कोल्हापूर ( प्रतिनिधी )- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून वातावरण पुन्हा तापू लागले आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारला थेट इशारा दिला आहे की, मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जेलमध्ये टाकले पाहिजे.
जरांगे यांचा आरोप
जारंगे यांच्या मते, छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा अपमान केला आहे.
समाजाला दिशाभूल करून, आरक्षण प्रक्रियेत अडथळे निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केला.
“जर समाजाच्या भावना दुखावल्या असतील, तर सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. अन्यथा आम्ही मोठा लढा उभारू,” असा इशारा त्यांनी दिला.
राजकीय वातावरण
जारंगे यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.
भुजबळ यांच्यावर यापूर्वी भ्रष्टाचाराच्या प्रकरणांतून कारवाई झाली असून, जेलवासाचा अनुभव त्यांना आहे.
त्यामुळे समाजात चर्चा सुरू झाली आहे की, जारंगे यांच्या मागणीनंतर सरकार दबावाखाली येणार का?

सरकारची अडचण
सरकारला एकीकडे मराठा समाजाचा रोष शांत करावा लागतोय, तर दुसरीकडे विद्यमान मंत्र्यांवर कारवाई करण्याचा प्रश्न गंभीर आहे.
येत्या काही दिवसांत या प्रकरणाचा राजकीय परीघ किती वाढतो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
ही बातमी चर्चेत असून, मराठा समाजाची भूमिका आणि सरकारचा पुढील निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
“ताज्या मराठी घडामोडी आणि नानाविध व्हिडीओ पाहण्यासाठी आत्ताच Link Marathi चॅनेल Subscribe आणि Follow करा!” 👇
https://whatsapp.com/channel/0029VaAEmrk002TEaYoPas0h

मुख्यसंपादक



