Homeआरोग्यतुळशी चे फायदे

तुळशी चे फायदे

         

तणाव कमी करते
तुळस दिवसभराचा थकवा दूर करते. अतिशय ताण असल्यास दररोज रात्री दूधात तुळशीची काही पानं टाकून, उकळून ते दूध पिण्याने फायदा होतो. याने मज्जासंस्थेला आराम मिळून तणाव कमी होण्याची शक्यता असते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते
तुळशीत मोठ्या प्रमाणात अॅन्टी-बॅक्टेरियल आणि अॅन्टी-इंफ्लिमेंट्री गुण असतात. जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्याचे काम करतात. दररोज तुळशीची पानं खाल्ल्याने फ्लूचा धोकाही दूर होण्यास मदत होते.

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यामध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळशी उपयुक्त असते. कफ तसेच वातदोषाचे शमन करणारी, पित्त वाढवणारी तुळशी दुर्गंधाची नाश करण्यास सक्षम असते.

जिभेवर पांढरा थर जमला असता, तोंडाची चव गेली असता तुळशीच्या रसाचे गूळ किंवा साखरेबरोबर बनविलेले चाटण घेण्याचा उपयोग होतो.

पोटात गॅस झाल्यामुळे दुखत असल्यास, पोट जड झाले असल्यास तुळशीची 10-12 पाने कपभर पाण्यात मंद आचेवर उकळावीत. एक कप पाणी उरले की त्यात चवीपुरते काळे मीठ व अर्धा चमचा साजूक तूप टाकून घोट घोट घ्यावे.

⚡तुळशी आपल्या रस, गुण, वीर्य, विपाक यांच्यायोगे शरीरातील कफदोष कमी करते, विशेषत कफदोष जेव्हा द्रव, स्निग्ध गुणाने वाढतो तेव्हा तुळशी उपयुक्त असते.
⚡खोकला, दम्यासारख्या रोगात जेव्हा श्वासाला दुर्गधी येते, तेव्हा तुळशीचा रस मधाबरोबर घेण्याचा चांगला उपयोग होतो.
⚡खोकल्यामुळे वा दम्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्यास, छातीत कफ भरून राहिला असल्यास तुळशीची बारीक केलेली पाने सुती कपड्यात बांधून पुरचुडी तयार करावी व ही पुरचुडी ज्येष्ठमधाच्या गरम काढ्यात बुडवून छातीवर, पोटावर व पाठीवर शेक केल्यास कफ सुटायला मदत मिळते व बरे वाटते.
⚡कफ असंतुलनामुळे सर्दी, खोकला झाला असता तुळशीचा रस, आल्याचा रस व मध एकत्र करून तयार केलेले चाटण घेतल्यास बरे वाटते.
⚡तुळशी उष्ण वीर्याची असल्याने घाम आणण्यास उत्तम असते, त्यामुळे तापात, विशेषत थंडी वाजून येणाऱ्या तापात तुळशी उपयोगी असते. तुळशीच्या काढयात पाय बुडवून व अंगावर ब्लॅकेट घेतले तर घाम येऊन ताप कमी होतो.
⚡लहान मुलाना सर्दी, खोकला, उलट्या होत असता तुळशीचा रस व मध हे चाटण थोडे थोडे चाटविण्याचा उपयोग होतो, विशेषत दात येत असताना या प्रकारचा त्रास होत असल्यास सहजपणे येण्यास उपयोग होतो.
⚡तुळशी ही उत्तम जंतुघ्न असते त्यामुळे संक्रामक आजारांमध्ये पाणी, हवा वगैरेतून रोगसक्रमण होऊ नये, यासाठी तुळशीचा वापर करता येतो. विशेषत पावसाळ्यात रोगसंक्रमण होऊ नये म्हणून तीन-चार तुळशीची पाने टाकून पाणी उकळून घ्यावे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular