विरजण

    परवा कुठल्याश्या मालिकेत शेजारची .....

तिच्या मैत्रिणीकडे विरजण मागायला येते .
सोसायटी हायफाय पण वातावरण अगदी चाळवजा ! एकमेकांशी संबंध अगदीच घरोब्याचे .
गोष्ट , अगदी किरकोळ पण खरेच विचार करायला लावणारी , त्यातूनच पुर्वीच्या चाळीविषयी च्या आठवणी जागृत झाल्या !
आमच्या घरी दूध , दही मुबलक , सुबत्ता खुप त्या मुळे लोक सतत काहीतरी मागायला येत. आई , आजी ही त्यांना जमेल तशी मदत करत !

  पूर्वीच्या काळी लोक एकमेकांच्या अडी - अडचणी अगदीच चुटकीसरशी सोडवत ! सदानकदा चोवीस तास दार उघडे ! हक्काने काय हवे नको ते मागून घेत ! वेळप्रसंगी मदतीला तत्पर असणारे शेजारी - पाजारी
    आजकाल माणसाला सगळी सुखे पायाशी लोळण घालतात तरीही मन ताजेतवाने नसते ...याचे कारण असे की , मन मोकळे करायला त्यांच्याकडे नसणारा वेळ

सदानकदा मेट्रोसिटीत घट्ट पाय रोवून धरण्यासाठी धावाधाव ! कामाचा ताणतणाव यातूनच होणारी चिडचिड
दगदग !

    आजही खेड्या - पाड्यातील बायका कधी काही मागण्याच्या हेतूने आपल्या सखीच्या घरी जाऊन संदेशाची देवाण - घेवाण करतात . विरजण मागण्याचे हे फक्त निमित्त असते ! त्यातूनही घरातील काही पेच प्रसंगाची एकमेकांकडे देवाण - घेवाण होते हा त्यामागील  हेतू ! 

   विरजण हा शब्दच माझ्या मनाला इतका भावला की बघा ना त्यात दुधाचे दही ....दह्याचे ताक ....ताकाचे लोणी ...

लोण्याचे तूप ….हा हा हा

http://linkmarathi.com/नक्की-कोण-बिघडलायनिसर्ग/


…..काय ती व्याप्ती ! फक्त योग्य ती सरमिसळ
झाली की आपोआप सगळे जुळून येते! ….
आणि ….आणि अशीच
सरमिसळ नात्याची ही होते . त्यातूनच मोठे कुटुंब , घराणी , वंशावळ जन्माला येते ..!

   आज इंग्रजी कॅलेंडर

प्रमाणे वर्षाचा शेवटचा दिवस ! या वर्षात आपण
नक्की काय काय गमावले
कुठे चुकलो याचा आढावा घेऊन नवीन वर्षाचा संकल्प करावा !

   आपले हिंदू नवं वर्ष जरी चैत्र पाडवा ला सुरू होत

असले तरी आपण लोक उत्सवप्रिय असल्याने आपल्याला हे एक निमित्तच !

  तर मंडळी या वर्षाचा आपण एक नवीन संकल्प करू नात्यातील मैत्रीतील विरजण अधिकाधिक दृढ करायचा ! एकमेकांपासून न दुरावण्यासाठी काय करता येईल याचा !

   स्वतः सुखी समाधानी राहून , इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करू . जीवन हे फुलांसारखे मानले आहे . गुलाबाचे फुल उत्तमच आहे ! प्रेमाचे प्रतिक मानले गेले . पण झेंडूच्या फुलाचं ही महत्व काही कमी नाही . नवरात्रीला देवीला तेच लागते . तसाच प्रकार नात्यात , मैत्रीत ! भेदभाव हा नसावा ! कोणी छोटा , कोणी मोठा नाही...!

शब्दांनीच मनुष्याचे व्यक्तिमत्त्व घडते म्हणून त्याचा वापर ही संयमाने , गोडीगुलाबीने करावा !

  आपली तर्जनी जेंव्हा दुसरा दोषी आहे म्हणून त्याला दाखवते तेंव्हा उरलेली तीन बोटे आपल्याकडे वळलेली असतात , याचे भान आपल्याला असावे !

  समोरचा माणूस कसा वागायला हवा हे आपल्या हाती नसते पण आपण कसे वागायला हवे हे आपण निश्चितपणे ठरवू शकतो . तर चला मंडळी ....मनातील नकारार्थी विचारांना तिलांजली देऊन नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करू ......!

    खेळात ज्या प्रमाणे हार - जीत असते , त्याच प्रमाणे ....जीवन हा दोन  घडीचा डाव आहे . त्यात अनेक चढ - उतार असणार !! यशाने हुरळून जाऊ नका ! अपयशाने खचू नका ! उद्या काय घडेल याची शाश्वती नसते म्हणूनच आलेल्या प्रत्येक दिवसाला , प्रत्येक क्षणाला आनंदाने सामोरे जायचे ! आणि म्हणूनच .

नात्यातील – मैत्रीतील विरजण अधिकाधिक घट्ट कसे होईल याचा संकल्प नवीन वर्षाच्या निमित्ताने करू !!! ….

http://linkmarathi.com/इंडियन-रबर-मँन्युफँक्चरस/

जॉब शोधताय…? मग तुम्ही योग्य msg वाचत आहात. अश्याच प्रकारचे नानाविध सरकारी आणि खाजगी जॉब अपडेट अगदी मोफत मिळवण्यासाठी खालील फेसबुक ग्रुप जॉईन करा…

https://www.facebook.com/groups/2574733692753005/?ref=share

©️®️सौ. राजश्री भावार्थी
पुणे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular