मरणाच्या दारातून जगण्याची
निघालेली वरात!
दुःख, दैन्य, दर्दभऱ्या
कहाणीचे फिटतील
हे पांग कधीतरी…
म्हणूनच पायातल्या
बेड्या रोखू शकणारच
नाहीत चालण्याची मनसुबे….
राखेच्या ढिगार्यावर
उभे असताना पेटून
उठण्याचे स्वप्न आहेच
उराशी बाळगलेलं…
कैक उन्हाळे-पावसाळे
झीजवलेत, कोण म्हणतं
नुसतं वय वाढल
त्याबरोबर अनुभवाचा
खजिना आहेच मोठ्या
खस्ता खाऊन मिळवलेला..
परिस्थितीच्या जोखडा
मुळं मार्गस्थ व्हायला
थोडा झाला ही असेल
उशीर पण पायाला
पडलेली कुरुपे, घट्टे,
खपल्या धरलेल्या जखमा
चालताना वेदना
जाणवूच देणार नाहीत…
कारण रस्ता कितीही खडतर
असला तरीही वेदना
आता जगण्याचा भाग
झाल्यात..
आता फक्त स्वतःला
घुसळून लोण्या सारखा
मऊदारपणा आणी जिवनाच
सारं आत्मसात करायच आहे.
जगन्नाथ काकडे
मेसखेडा

मुख्यसंपादक