गड-कोट-दुर्गांबाबत लहान मुलांमध्ये आवड व ओढ निर्माण व्हावी तसेच तरुणांमध्ये असलेल्या किल्ले संवर्धनाबद्दलच्या जाणिवेला योग्य दिशा लाभावी म्हणून हा एक छोटासा प्रयत्न.
स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, क्रमांक पारितोषिकांसाठी निवडण्यात येतील.
त्याचप्रमाणे स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येतील.
१८ वर्षा पर्यंत चे स्पर्धक सहभाग घेऊ शकतात
स्पर्धेचे नियम व अटी :
स्पर्धेसाठी किल्ला बनविताना कमीत कमी १ जण किंवा जास्तीत जास्त ५ जणांचा १ गट ( ग्रुप ) असावा.
किल्ल्यासाठी योग्य ते स्थळ अथवा जागा स्पर्धकांनी स्वतः निवडून ४ नोव्हेंबर २०२१ च्या आधी किल्ला पुर्णपणे बनवुन तयार असणे आवश्यक आहे.
किल्ल्यांना परिक्षक स्वतः येऊन भेट देतील.
किल्ला स्व-हस्त कौशल्यातून व पर्यावरणपूरक बनविलेला असावा. थर्माकोल, प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिकचा वापर टाळा. किल्ला लाल माती, शाडू माती, कागदी किंवा पुठ्ठ्याचा बनवू शकता.
स्पर्धकांना किल्ल्याबाबत भौगोलिक व ऐतिहासिक सविस्तर माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून तुम्ही ते आमच्या परीक्षकांसमोर मांडू शकाल.
किल्ल्या शेजारी स्पर्धकांनी आपल्या गटाचे व किल्ल्याचे नाव नमूद करणे बंधनकारक राहील.
स्पर्धेत प्रवेशाकरिता नावनोंदणीची शेवटची तारिख : ३१ ऑक्टोबर २०२१
स्पर्धेसाठी ₹ ५१ /- प्रवेश-शुल्क भरुन आपण आपला सहभाग नोंदवू शकता.
सहभागाची प्रक्रिया
◆ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे माहिती आमच्या वॉट्सअप क्रमांकावर पाठवा.
१. तुमचे किंवा तुमच्या गटाचे नाव :
२. किल्ल्याचे नाव आणि किल्ल्याचा प्रकार :
[ उदाहरणार्थ – सिंधुदुर्ग (जलदुर्ग) ]
३. कमीत कमी १ किंवा जास्तीत जास्त ५ स्पर्धकांचे नाव आणि वय :
४. संपुर्ण पत्ता :
५. एकूण ३ जणांचे संपर्क क्रमांक :
(कॉलिंग व वॉट्सअप क्रमांक वेगळा असेल तर तो सुद्धा द्यावा.)
प्रवेशासाठी संपर्क
अनिकेत कुडतरकर :- ९९६०९८१९६२
दिपेश सोगम :- ९९२३३९९२८४
विजय पराडकर :-९५७९५२१६७४
सुरज पाटील :-८४८५०७१२३०
मनोज मोरे :- ९५९४२१३८०८
( टिप – फक्त या स्पर्धेच्या उपक्रमाचे आणि बक्षीस समारंभाच्या वेळापत्रकाचे सर्व अधिकार
सह्याद्री प्रतिष्ठान वसई विरार विभागकडेच राहतील. )

समन्वयक – पालघर जिल्हा
नमस्कार –
आज आपला इतिहास कुठेतरी मागे पडत चालला आहे, तसेच इतिहास फक्त पुस्तकातल्या पानांपुरताच मर्यादित न राहता प्रत्येकाच्या मना-मनांत रुजला पाहिजे. याच हेतूने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे.
तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने भाग घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे…
आपल्या पाल्याला गड किल्ले बनवायला प्रेरित करा
व त्यांना गड किल्ल्या वर सोता रिसर्च करण्यास प्रोत्साहन द्या
जेणे करून त्यांना गड किल्ल्याची आवड लागेल
फक एक स्पर्धा ठेवणे हाच आमचा उद्धेश नाही आहे.