Home Blog Page 10
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची निवडणूक जवळ येईल तसतसे इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी वाढतच चालली आहे. आरक्षणामुळे ज्यांची अडचण झाली आहे असे उमेदवार दुसऱ्या वॉर्डात आपले बास्तान बसवायचे सुरु केले आहे. यासाठी आपल्या नातेवाईकांची, अप्तेष्टांची आणि हुकमी मते घेऊन आपल्या सोयीच्या वॉर्डात त्या मतदारांची खोटे पुरावे सादर करून वेगळ्या वॉर्डात मतदार नोंदी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी खोटे पुरावे...
आजरा(हसन तकीलदार):-वसंतराव देसाई आजरा शेतकरी सह. साखर कारखान्याचा सन 2025-26 चा गळीत हंगाम 24 ऑक्टोबर 2025 रोजी सुरु होणार असून तालुक्याच्या इतर गावापासून येणारे रस्ते अतिपावसामुळे पूर्णपणे उखडून खड्डे पडलेले आहेत त्यामुळे सदर रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी असे निवेदन आजरा साखर कारखान्याच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे. https://youtu.be/mHaPYUMpJ70?si=bxJQiAFJd9ixHJso यावर्षी साधारणपणे मे मध्यापासून पावसाने आपले अस्तित्व दाखवून दिले...
आजरा(हसन तकीलदार):-आपल्या विविध मागण्यासाठी तसेच हत्तीच्या वास्तव्याला कंटाळून घाटकरवाडी, धनगरमोळा, सुळेरान, किटवडे, आंबाडे या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी सलग दोन दिवस आंदोलन सुरु केले होते. पहिल्यांदा चर्चा निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सहाय्य्क वनसंरक्षक विलास काळे यांनी आंदोलकांच्या स्थानिक व आपल्या अख्त्यारितील काही मागण्या पूर्ण करण्याची हमी देऊन अन्य धोरणात्मक मागण्याबाबत वरीष्ठाशी बैठक लावून मार्ग काढण्याची लेखी हमी दिल्यानंतर तसेच...
आजरा(हसन तकीलदार):- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम 2025-26चा 27वा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ आज बुधवार दि. 15/10/2025 रोजी सकाळी 11:00 वा.कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई, व्हा. चेअरमन सुभाष देसाई व सर्व संचालक मंडळ यांचे हस्ते संपन्न झाला. https://youtu.be/mHaPYUMpJ70?si=y3VIDhHI8EwJnzIv ...
आजरा(हसन तकीलदार):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)गटाचा बुरुडे ता. आजरा येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवरानी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. सर्वांनी एकत्रित येऊन एक दिलाने काम करूया असेही सांगण्यात आले. ...
आजरा(हसन तकीलदार):-भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याची केलेली कृती तसेच सोनम वांगचूक या अभियंता, शास्त्रज्ञ आणि लडाख मधील सामाजिक व शैक्षणिक चळवळीचे संस्थापक यांना केलेली अटक या घटना निषेधार्थ असून सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकणाऱ्या या व्यक्तिवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करून तातडीने अटक करावी आणि सोनम वांगचूक यांना केलेली अटक ही चुकीची असून त्यांची तात्काळ सुटका करावी अशा...
अमृतसर ( प्रतिनिधी ) -: भारतातील प्रसिद्ध पंजाबी बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर सिंग घुमन (Varinder Singh Ghuman) यांचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमृतसर येथील एका खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. घुमन हे काही दिवसांपूर्वी खांद्याच्या दुखण्याच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया (operation) केली होती. परंतु शस्त्रक्रियेनंतर...
दिल्ली - आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस सुरू आहे. मी, डॉ. रवींद्र पाटील, गेल्या तीन दशकांपासून क्रिकेटच्या जगात फिरतोय आणि अनेक ऐतिहासिक सामन्यांचे साक्षीदार झालोय. पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि १४० धावांनी विजय मिळवून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आजचा सामना भारतासाठी मालिका २-० ने जिंकण्याची...
आजरा(हसन तकीलदार):-आपल्या विविध मागण्यासाठी तिन्ही वीज कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने संपाचे हत्यार उपसले आहे. दि. 29 सप्टेंबर 2025 पासून टप्प्या टप्प्याने अधिकारी व विजकर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. सरकारी मालकीच्या तिन्ही वीज कंपन्याकडून कामगार विरोधी धोरणांची एकतर्फी अंमलबजावणी होत असल्याने तसेच महत्वाच्या व धोरणात्मक बाबींमध्ये कामगार संघटनांच्या मागण्या व हरकतींचा समावेश न करता घाईत व एकतर्फी लादलेले निर्णय कामगारांचे आयुष्य...
आजरा(हसन तकीलदार) :-यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप नुकसान झाले आहे. यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी ₹50हजार इतकी थेट आर्थिक मदत जाहीर करावी. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सर्व कर्जातून कर्जमुक्त करावे. पीक विम्याचे कठीण निकष तातडीने शिथिल करून पंचनाम्याची प्रक्रिया बाजूला ठेवत विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. अतिवृष्टीमुळे घरे व पशुधनाचे नुकसान झालेल्या नागरिकांना...