किशोर स्वरांगीला घेऊन इकडे या ना, मी काम करतेय, रडतेय ती.....
किशोर लगेच धावत स्वरांगी जवळ जाऊन---अ…ले…ले ले लेकाय झालं माझ्या शोनूला, कच्याला ललते ती….खाऊ हवाय…खाऊदेऊ का तुला खाऊ…..
खाऊ नंतर द्या तीला, आधी आणा इकडे……भूक लागली असेल तिला……शेवंती म्हणाली..
आणि ….आणि…..आणि…….
ये शेवंती तू ओरडलीस का आता, काय झालं….काय झालं..?
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
...
शिवनेरीवर जिजाऊंच्या पोटी "एक राजा" जन्मास आला होता,खेळण्याच्या वयात ज्यांनी तलवार, ढाल, भाला हातात घेतला होता….असे"छत्रपती शिवाजी महाराज" होते म्हणून महाराष्ट्र घडला होतास्वराज्य घडवण्यासाठी माझा राजा मुघलशाहीला एकटा नडला होता…..!!
आपल्या प्राणाची बाजी लावून, मावळ्यांनी "स्वराज्याचं स्वप्न सत्यात उतरवलं होत,याच मातीत "स्वतंत्र मराठा साम्राज्य" निर्माण झालं होतं,"सूर्याहुन तेजस्वी राजा" नाव, इतिहासात कोरलं गेलं होतं,आज सोनियाचा दिन उगवता झाला होता, (६...
५ जून पर्यावरण दिवस….
पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर, असाच समज सर्वांचा आहे, परंतु आपल्या जीवनावर परिणाम करणारी भोवतालची परिस्थिती म्हणजेच पर्यावरण होय.
माणूस हा सक्षम प्राणी असला तरी त्याने आपल्या गरजेपुरतं मर्यादित न राहता, आपल्या पुढच्या अनेक पिढ्या आपल्यामुळे सुखी व्हावीत म्हणून करून ठेवलेल्या उपभोगाच्या गोष्टी, पर्यावरणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परीणाम करत असतात.आज पर्यावरणाचा पूर्णपणे ऱ्हास होत चाललेला आहे.
प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं...
जगातील जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 5 जून पर्यावरण दिन साजरा केला जातो. यामागील मुख्य उद्देश म्हणजे,जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे. संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे गरजेचे आहे.
सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. हा नैसर्गिक परिसर म्हणजे जमीन, हवा, पाणी, झाडे ,नदी, डोंगर जीवसृष्टी हे सर्व. पण हे आज कोठे सुरक्षित आहे ? ध्वनी प्रदूषण,...
कोल्हापूर, :
गडहिंग्लज अर्बन बँकेच्या ठेवीदारांनी कोणतीही आणि कसलीही चिंता करू नये, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आपण या बँकेच्या मागे हिमालयसारखा उभा आहे, असेही मंत्री मुश्रीफ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे, सत्तर वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या बँकेमध्ये मार्च २०२० साली गुंतवणूक समितीची मान्यता न घेताच बँकेच्या जनरल मॅनेजरने १३ कोटी रुपये फंडामध्ये...
बीड पासुन 120 किलोमीटर अंतरावर व नगरपासून 45 किलोमीटर अंतरावर असलेलं. आष्टी तालुक्यातील माझं गाव श्रीक्षेत्र वाहिरा. तिन्ही बाजूंनी टेकडी व मध्यभागी गाव. ऐतिहासिक व धार्मिक क्षेत्र म्हणून ओळख. श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेली ही वाहिरा भूमी.वाहिरे ग्राम संभूतं अविंध कुल भास्करम् l योगसंग्राम निर्माता तं नमामि महंमदम्ll संत शेख महंमद महाराज यांनी...
आज आपण भारतात काही भागात पेट्रोल ने शतक पूर्ण केले किंवा त्या मार्गावर असल्याचे पाहतो. या शतका मुळे कोणाला आनंद झाला असेल तर विरळच..पण आम्ही तुम्हाला असे काही सांगणार आहोत की त्यामुळे तुम्हाला धक्काच बसेल . कारण जगभरात असे काही देश आहेत जे इतक्या कमी किमतीत पेट्रोल मिळते की त्यांना भारतात आल्यावर पाण्याची बाटली सुद्धा महाग वाटेल.सर्वात स्वस्त पेट्रोल
व्हेनेझुएला...
दिनकर उगवला, पुन्हा आज मावळला.सृष्टीचक्र चाले नित्य,कधी कळले का तुला ?
लक्ष लक्ष प्राणी पक्षी,कोण चारापाणी देतो ?नियतीचा खेळ गड्या,सांगा कोणाला कळतो ?
जन्म-मृत्यूचे हे कोडे,सांगा कुणाला सुटले ?देई प्रयत्न सोडून,म्हणे नशीब फुटले ….
नकळत होते प्रेम,ताबा सुटतो मनाचाभावना या अनावर,क्षण त्याचा आनंदाचा…
चाले गाडी जीवनाची,सरे क्षण कणकणनकळत घडे सारे, स्वीकारते माझे मन…
चाले चक्र निरंतर , नकळत घडे सारेशक्य तेवढे जाणावे , अज्ञानात...
पु.ल.नेहमी म्हणायचे ,जवळजवळ निम्मा महाराष्ट्र 1 जून ला जन्माला आला आहे आणि तो ही गुरुजींच्या पुण्याईमुळे…
सर्व कष्ट आणि कटकटीमधून वेळ मिळाल्यावर मुलाला गावातील मराठी शाळेत हात धरून पायी चालत घेऊन जाउन शाळेत गुरूजी समोर उभे केल्यानंतर शाळाप्रवेश होई
मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी वय वर्ष ६ पूर्ण असावे लागते त्यामुळे पालकांनी सांगायचे अंदाजे व गुरुजींनी ठोकताळे ठरवून जन्म तारीख अशी टाकायची...
नवी दिल्ली (प्रतिनिधी )- भारत सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबधित जे नवीन नियम दिलेत ते आम्हाला लागू होत नाहीत. त्यासाठी त्यांनी आम्ही केवळ सर्च इंजिन म्हणून काम करतो असे कारण देत गुगलने आपली भूमिका दिल्ली हाय कोर्टात स्पष्ट केली. हे केंद्र सरकारचे नियम फक्त सोशल मीडिया...









