Home Blog Page 283
बरोबर ३३ वर्षापूर्वी दिनांक १९ मार्च, १९८८ रोजी माझी वकिली सुरू झाली. बायकोने तिच्या बहिणीकडून उसने आणलेल्या पैशात फोर्टच्या दुकानात जाऊन वकिलीचा काळा कोट विकत घेतला. तो घेताना सोबत बायको होतीच. आज १९ मार्च, २०२१ म्हणजे त्या दिवसाला ३३ वर्षे झाली. केवढा मोठा काळ मध्ये निघून गेलाय. मी कायद्याची प्रॕक्टिस कशी केली व त्यातून मी स्वतः काय शिकलो याविषयी...
स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात प्राणप्रिय व्यक्ती म्हणजे तिचा जन्मदाता बाप..... शक्यतो आईपेक्षाही मुलींचा बापावर जास्त जीव असतो....आणि बापाचाही आपल्या मुलांपेक्षा मुलीवर जास्त जीव असतो..... आपली मुलगी उदया दुसऱ्यांच्या घरी जाणार म्हणून बाप तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार असतो.... तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो.... चांगलं शिक्षण देतो.... आपल्या पायावर...
(१) डॉक्टरी व वकिली हे दोन्ही कायदेशीर मारामारीचे व्यवसाय, मग त्यांना तुम्ही उदात्त व्यवसाय म्हणा नाहीतर आणखी काही म्हणा! मारामारी म्हणजे संघर्ष आणि या दोन्हीही व्यवसायांत संघर्ष हा पदोपदी आहे. डॉक्टरांची मारामारी रोगजंतूंशी, कॅन्सरसारख्या गाठींशी असते. पेशंटना रोगजंतू, कॕन्सरच्या गाठी या भयंकर वेदना देतात. म्हणून हे रोगजंतू, या गाठी पेशंटबरोबर डॉक्टरांच्याही शत्रू होतात. डॉक्टर्स त्यांच्या औषधांनी किंवा शस्त्रक्रियांनी या...
एक होता लेखक….भाग -- ४ बार क्लोज झालाय सर.….आता तुम्हाला निघायला हवं.रात्र फार झालीय तुम्ही उठा आता.वेटर त्याला अदबीने सांगत होता.एव्हाना रात्रीचे बारा वाजून गेले होते.कोल्हापुरातल्या रेल्वे स्टेशनच्या बाजूचा बियरबार बंद होण्याची ही नेहमीची वेळ.पण सगळे बेवडे निघून गेले तरीही त्याचं पिणं चालूच होतं.ए….. वेटर…..वेटर्रर्रर्रर्रर्र……काय पाहिजे…?वेटरचा प्रश्न.चकना आण.आणि सोबतीला…..एक बाटली घेऊन ये.फूट…..च्याइचं वेटर हेच्या….तो तोंडातल्या तोंडात शिव्या देत पुटपुटला.साहेब… बाटली...
(१) निसर्गाला जीवसृष्टी निर्माण करायला ही पृथ्वीच का आवडली असावी हे तो निसर्गच जाणो. पण ग्रहताऱ्यांचे विशाल आकाश फिरते ठेऊन त्यातला एकच सूर्य काय निवडायचा, मग त्या सूर्याचे तेज, त्याचा सूर्यप्रकाश बरोबर घेऊन पृथ्वीवर हवा, पाणी व जमीन या निर्जीव गोष्टी काय निर्माण करायच्या, मग सूर्यप्रकाश, हवा, पाणी, जमीन यांच्यातून विविध गुणधर्माचे नानाविध निर्जीव पदार्थ काय बनवायचे, पुढे मग...
आजरा (अमित गुरव ) - सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रची आजरा तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली . गेले 4 वर्षांपासुन सरपंच संघटना तालुक्यामध्ये कार्यरत असून संघटनेच्या माध्यमातून सरपंच, उपसरपंच, सदस्य पर्यायाने प्रत्येक ग्रामपंचायतीचे प्रश्न अडचणी सोडवण्याचे काम करत आहे असे संघटनेचे जिल्हाकार्याध्यक्ष संभाजीराव सरदेसाई यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले. राज्यकार्यकारनि सदस्य राजू पोतनीस यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा व पार्श्वभूमी विषयी माहिती दिली....
आजरा -: ( प्रतिनिधी )- महिला दिनाचे औचित्य साधून गुरव अकॅडमी मार्फत महिलांची अबँकस कार्यशाळा आयोजित केली होती .उद्योजिका मेघा विकास फरणेकर ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. गुरव प्रोऍक्टिव्ह अबँकस अकॅडमी चे अध्यक्ष आणि...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जखमी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्यावर हल्ला झाला असल्याचा दावा केला होता. दरम्यान, त्यांच्यावर हल्ला झाल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल निरीक्षकांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. निवडणूक आयोगानं विवेक दुबे आणि अजय नायक यांना अहवाल सोपवण्याचे आदेश दिले होते. चार पाच लोकांनी आपल्यावर हल्ला केला होता असा दावा पायाला...
शेळ्यामेंढ्यांना मेंढपाळ लागतो कारण त्यांना अक्कल नसते, पण आम्हा माणसांना नेते का लागतात? माणूस म्हणून जन्मल्यावर माणूस म्हणूनच जगायचे, जनावर म्हणून जगायचे नाही ही साधी अक्कल आम्हाला नाही काय? आम्ही काय मेंढरे आहोत? नाहीतरी त्या मुंबई लोकलमध्ये आम्ही मेंढरासारखे कोंबलो जातो आणि मेंढरासारखे बाहेर ढकललो जातो. कुणी आणि का केली आमची अशी मेंढरांसारखी स्थिती? जगातील आर्थिक संपत्ती २५% हूनही...
गडहिंग्लज (प्रतिनिधी ) - कौटुंबिक वादातून एका पोलीस नाईक पदावर कार्यरत असणाऱ्या पोलिसाने आत्महत्या केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. रामदास अशोक घस्ती (रा . बसर्गे ता - गडहिंग्लज ) असे त्यांचे नाव आहे.आत्महत्येपूर्वी 'मी चाललोय ' असे व्हाट्सअप ला स्टेटस ठेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. याबाबतची वर्दी कंचनकुमार बाबुराव घस्ती यांनी गडहिंग्लज पोलिस ठाण्यात दिली आहे.घस्ती हे चंदगड...