HomeघडामोडीKolhapur Bandh: कोल्हापूर बंदला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आज संध्याकाळपर्यंत इंटरनेट राहणार...

Kolhapur Bandh: कोल्हापूर बंदला हिंसक वळण; पोलिसांच्या लाठीचार्जनंतर आज संध्याकाळपर्यंत इंटरनेट राहणार बंद |

शिवराज्याभिषेकदिनी झालेल्या वादग्रस्त प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. हिंदुत्ववादी संघटना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले आहेत. कोल्हापूरमध्ये 19 जूनपर्यंत जमाव बंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. गृहमंत्रालयाच्या आदेशाने ही सेवा आज संध्याकाळपर्यंत बंद राहणार आहे.

Kolhapur Bandh
Kolhapur Bandh

Kolhapur Bandh:

Kolhapur Bandh:शिवराज्यभिषेक दिनी कोल्हापुरात (Kolhapur News) सात तरुणांनी आक्षेपार्ह व्हाॅट्सअॅप स्टेट्स ठेवल्याने संतप्त पडसाद उमटले. या घटनेनंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक सबंधित तरुणांविरोधात कारवाई करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी लक्ष्मीपुरी आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या धरला. ठिय्या धरल्यानंतर कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी, सीपीआर आणि दसरा चौकात दगडफेकीचे प्रकार घडले. यानंतर पोलिसांनी बळाचा तरुणांना पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली. मंगळवारी (6 जून) दुपारी झालेला हा प्रकार रात्री उशिरापर्यंत सुरु होता.
शिवराज्याभिषेक दिनी झालेल्या या प्रकारानंतर कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत आज (7 जून) कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.

इंटरनेट बंद:


व्हाट्सअँप स्टेटस वरून पेटलेल भांडण आता इंटरनेट बंद पर्यंत पोहचले आहे त्यामुळे आज रात्री पर्यंत इन्टरनेट बंद असेल . आक्रमक झालेला जनतेवर पोलिसांनी लाठीचार केला . कोणावरही अन्याय होणार नाहीं याची खबरदारी घ्यावी असा आदेश राज्याचा गृहमंत्रालयानी दिला आहे .

कारवाई होणारच, पोलीस अधीक्षकांचा इशारा


दरम्यान, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कोणत्याही ओळखीची गरज नाही, तक्रार घेतली नसल्यास त्याचे उत्तरदायित्व माझे असेल. जो कायदा मोडेल, त्याच्यावर कारवाई होणारच, कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बंद मागे घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे. विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश


Kolhapur Bandh:दुसरीकडे, आक्षेपार्ह स्टेटस लावण्यावरुन निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबाबतचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना रात्री दिला आहे. पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊन वा स्टेटसमुळे कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकतो. अहवालानुसार अपर जिल्हादंडाधिकारी भगवान कांबळे यांनी 19 जूनच्या रात्री बारापर्यंत जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पाच किंवा त्यापेक्षा जादा लोक एकत्र जमा होणे, जमाव जमवणे, मिरवणुका काढणे, सभा घेण्यास बंदी आहे. तसेच लाठ्या, काठ्या वा शारीरिक इजा करतील अशा वस्तू, दगड, प्रतिमांचे प्रदर्शन, आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे आदी प्रकारांना मनाई केली आहे.

अधिक घडामोडी साठी

संदर्भ

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular