स्मशान

सुनसान रस्त्यावरून चालताना

सहज नजर स्मशानाकडे वळली

सगळीच मयत लोकांची चर्चा खूप रंगली होती

डोकावून पाहण्यापासून आवरले नाही

म्हणून पाहिले

तर ते ,

स्वतःच्या चुकांचे पाडा वाचत होते

आपले कोण परके कोण ते त्यांने ओळखले होते,

पण थोडे आता उशीरच झाले हाेते

जीवनाचे अर्थ त्यांना कळले तर होते ,

पण जगणे आता नशिबी नव्हते

आपले म्हणणाऱ्यांचे वागणे पाहत होते

आपले असूनही परकीच असतात लोक ,

हे शहाणपण त्यांना मेल्यानंतर मात्र आले होते

आता खऱ्या अर्थाने ते आनंदी होते,

कारण मरणानंतर त्यांना जगणे समजले होते

नेहा नितीन संखे✍️✍️

विजय वैशाली दत्ताराम पराडकर
विजय वैशाली दत्ताराम पराडकर
समन्वयक - पालघर जिल्हा
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular