Homeवैशिष्ट्येछत्रपती शिवरायांचं मावळेनरवीर तानाजी मालुसरे

छत्रपती शिवरायांचं मावळे
नरवीर तानाजी मालुसरे

शहाजींनी स्वप्न पाहीले,
जिजाऊंनी मनी बिंबवीले.
मावळ्यांना एकत्र केले,
शिवरायांचे स्वराज्य घडले.१

गुलामगिरी ती परकीयांची ,
अत्याचार अन् जुलूमाची ,
तोडूनी शृंखला परदास्याची.
सत्ता स्थापीली‌ रयतेची. २

स्वराज्य उभारणीसाठी ,
मावळे रणांगणावर झुंजले.
एकेका महान नररत्नांसाठी,
डोळे सह्याद्रीचे पाणावले .३

रायबाचे लग्न थांबवूनी ,
केली चढाई तानाजीने.
सूर्याजी ,शेलार मामानी,
रण गाजवीले पराक्रमाने.४

ढाल तुटता तानीजीनी,
केली लढाई पागोट्यानी.
चिरनिद्रा घेतली तानाजीने,
उदयभानाचा घाव लागुनी.५

सूर्याजीच्या प्रेरणेनी ,
भीडले मावळे यवनांशी.
कोंढाणा किल्ला जिंकूनी,
अद्दल घडविली फिरंग्यांनी.६

शोक अनावर शिवरायांचा,
सखा गमवीला जीवाभावाचा.
तानाजीरूपी त्या नररत्नाचा,
संन्मान वाढवीला सिंहगडाचा .७

कवी. श्री रेवाशंकर वाघ ठाणे

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular