Home Blog Page 271
( प्रतिनिधी ) : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र एन जी ओ समिती ( महाराष्ट्र राज्य ) च्या झूम मीटिंग ऑनलाईन कार्यकारिणी बैठकीत युवराज रामचंद्र येडुरे यांची राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली . ते शेणगाव येथील स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापंक अध्यक्ष आहेत . सामाजिक क्षेञात गेली बारा वर्ष कार्यरत आहेत. तसचे गेल्या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्र एनजीओ समितीच्या अध्यक्षपदाची धुरा...
१ मे हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा का करतात ? काय आहे या दिवसाचा इतिहास ??१ मे हा दिवस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्वाचा आहे. पहिलं कारण आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. दुसरं कारण आहे या दिवसाला आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि मे दिन म्हणून जगभर मान्यता मिळाली आहे.१ मे ला महाराष्ट्र दिन...
महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. १ मे, १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते.महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.२१ नोव्हेंबर इ.स.१९५६ दिवशी फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण...
खुळूक् खुळ्ळूक असा घुंगरांचा आवाज आला की शेतकऱ्याला बैलगाडी आठवते, एखाद्या गुलहौशी माणसाला लावणी आठवते आणि आम्हा शहरवासियांना रसवंती गृह आठवते!!!भर दुपारी किंवा उन्हे उतरत्या संध्याकाळी घशाला कोरड पडलेली असताना जर हा घुंगरांचा आवाज ऐकू आला तर आपले पाय आपसूक त्या दिशेने वळतात आणि आपण त्या रसवंती गृहाजवळ जाऊन पोहोचतो.ते सतत फिरणारे यंत्र, काचेच्या ग्लासांचा खणखणाट,रस गाळणारा एखादा दादा...
देवाची करणी आपला निसर्ग म्हणजे अनेक प्रकारच्या चमत्कारांचे आगरच आहे जणू. निसर्गातील अनेक गोष्टींचे निरिक्षण केले की आपल्या ज्ञानात भर पडत राहाते. यातील एक चमत्कार म्हणजे आपला नारळ! इतक्या कठीण कवचाच्या आत इतके मृदू खोबरे आणि मधूर पाणी असते याचा ज्या मानवाला पहिल्यांदा शोध लागला असेल त्याला किती नवल वाटले असेल नाही!नारळाचे झाड हे जर कल्पवृक्ष मानले तर नारळपाणी म्हणजे...
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले हे समजण्यासाठी बाहेरचे तापमान वाढायच्या आधीच टिव्हीवर कोल्ड्रिंक्स, अमूललस्सी वगैरेंच्या जाहिराती सुरू होतात मग हळूहळू उन्हाच्या झळा बसायला सुरुवात होते.मागच्यावेळी मी लिंबूसरबता विषयी लिहिले होते. त्या सारखेच किंबहुना मला त्यापेक्षाही आवडणारे घरगुती सरबत म्हणजे कोकम सरबत . अतिशय आल्हाददायक रंग असलेली आणि त्यापेक्षाही उत्तम चव असणारी या फळांची झाडे कोकण परिसरात मुबलक प्रमाणात दिसतात. काजू,...
लस्सी जैसी कोई नही. काही दिवसांपूर्वी एक कविता वाचनात आली. लस्सी ते चा असे त्या कवितेचे नाव होते. कवी अन्वर मसूद यांनी पंजाबीत लिहिलेली ही कविता व तिचे हिंदी रुपांतर पहाण्यात आले.कवितेत लस्सी आणि चहा यापैकी कोण जास्त बरे आहे असा विवाद लस्सी आणि चहामध्ये झालेला दाखवला आहे. शेवटी ते दुधाला विचारतात की त्यांच्यात जास्त उपयोगी कोण? दुध त्यांचा निवाडा...
सध्या गुगलबाई गुगलबाई सांगतेस का ग? हा खेळ सुरू आहे. हा खेळ खेळताना एकातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे असे काहीतरी पहात राहिले जाते. त्यात भोजनकुतूहल नावाच्या ग्रंथावरची लेखमाला दिसली. कुतुहलापोटी मी पण भराभर वाचली.तंजावर येथील एकोजीराजे यांच्या पत्नी दीपाबाई यांनी रघुनाथ पंत नवास्थे या महाराष्ट्रातून तिथे पोचलेल्या पंडिताकडून हा ग्रंथ लिहून घेतला.हा ग्रंथ संस्कृतमधून श्लोक स्वरूपात लिहिलेला असला तरी त्यात...
पूर्वी ऋतू बदलाची चाहूल निसर्गातून मिळायची. पावसाआधी येणाऱ्या काळ्या मुंग्या, पाऊस जाताना भिरभिरणारे चतूर नावाचे किटक पानगळ वगैरे वगैरे आताशा टिव्हीवरच्या जाहिराती ऋतू बदलत असल्याचे जाणवून देतात.व्हॅसलिन, बोरोलिन वगैरे गुबलीगुबली गुश म्हणून थंडीचे स्वागत करतात तर कतरिना, शाहरुख, ऋतिक इत्यादी थंड पेये प्यायला लागले की अरेच्चा उन्हाळा आला वाटतं (तशी मुंबईत थंडी पण सर्दीमें भी गरमी का एहसासच देत...
सायंकाळी दोघे भांडलेतो तिच्यासोबत खूप तंडलाती त्याच्यावर खेकसलीतो ही तिच्यावर ओरडलातो रागात बाहेर गेलाती घरातल्या घरात कुढत व्हतीआसू दिसत नसले तरीमनातल्या मनात रडत व्हती तो उशिरा घरी आलाथेट स्वयंपाक घरात घुसलाअन जेवायला बसलाऊन ऊन भाकर आनपरातीतली हरभऱ्याची भाजीखाता खाता तिची स्तुतीकरू लागलासवयीप्रमाणे…..! तिची पण कळी खुलत व्हतीभांडण विसरून गाडीभलतीकडेच वळत व्हतीनंतर रात्र झालीविजा चमकल्याढगांनी ढगाला कवेत घेतलेबेधुंद धारा बरसल्यातहानलेली जमीन तृप्त...