Home Blog Page 297
सौभाग्यालंकारांतील एक महत्त्वाचा अलंकार म्हणजे पदांगुलीतील ‘जोडवी’ किंवा ‘बिछवा’ (टो रिंग). ती म्हणजे पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटात घालावयाची चांदीची किंवा इतर धातूंची वळी असतात. प्राचीन काळापासून सुवासिनी स्त्रिया याचा वापर करत असाव्यात. वाल्मीकिरामायणामध्येही ‘वलय’ या अर्थी जोडव्यांचा उल्लेख आढळतो. जुट्-जुड् या धातूपासून जोडवी हा शब्द बनला असून त्याचा अर्थ बंधन असा आहे. हा अलंकार विवाहोत्तर घालावयाचा असल्याने सौभाग्याचे किंवा पातिव्रत्याचे बंधन...
हिंदु धर्मात देवीची विशेष आराधना वर्षातून दोन वेळा केली जाते. वासंतिक नवरात्र - वासंतिक नवरात्रात चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमीपर्यंत वशारदीय नवरात्र - शारदीय नवरात्रात आश्विन शुद्ध प्रतीपदा ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची उपासना केली जाते. शारदीय नवरात्रात `घटस्थापना' हा मुख्य विधी असतो. घटस्थापना -नवरात्रात पहिलाच घटस्थापनेचा दिवस महत्वाचा मानला जातो. या दिवशी मातीच्या वेदीवर घटाच्यावर पसरलेल्या ताम्हणात कुलदेवतेच्या...
भगवान, परमात्मा किंवा ईश्वर या तीन्हींचाही अर्थक एकच. पण शास्त्रांमध्ये देवी देवतांची अनेक रूपे सांगण्यात आली आहेत. हिंदू धर्मानुसार ३३ कोटी देवी-देवता मानल्या जातात. प्राचीन काळापासून भारतामध्ये असंख्य देव-देवतांना पूजले जाते. याविषयी अनेकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की खरोखरच ३३ कोटी देवी देवता असतील का ? वेद-पुरांणांमध्ये ३३ 'कोटि' देवी - देवता असल्याचे म्हटले आहे. येथे कोटी हा शब्द विशेषणात्मक...
मंगलाष्टक म्हणजे वधू-वरांसाठी घरातील ज्येष्ठांनी आशीर्वादरूपी गायलेली आठ कडवी असतात. त्याच्या माध्यमातून उभयतांच्या भावी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते. त्यामुळे पारंपारिक पद्धतीने ही प्रार्थना लग्नाच्या मुहूर्तावर गायली जाते. हिंदूंमध्ये मातापित्यांच्या पुढाकाराने किंवा संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी महाराष्ट्र आणि त्याच्या आसपासच्या भागांत म्हटल्या जात असलेल्या पद्यरचनांना मंगलाष्टक या नावाने ओळखले जाते. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय हिंदू समाजात प्रचलित आहे. विवाह...
संस्कार म्हणजे सदाचरण. मानवी जीवनातील कर्म ज्याला नैतिकतेची जोड आहे. संस्कार हा कर्माचा एक असा भाग आहे जो संस्कृती मधून जन्माला येतो. संस्कृती टिकली तर संस्कार टिकतात आणि संस्कारी कर्मातूनच संस्कृती जन्माला येते. हिंदु धर्मात संस्कृती आणि संस्कार या दोन्ही गोष्टीना खूप महत्व आहे. आणि हि हिंदु संस्कृती टिकून राहावी म्हणून आपल्या पूर्व ऋषीमुनींनी प्रत्येक मानवी जीवाला संस्काराने जोडून...
'वारी' हा शब्द कानी पडताच आठवण येते ती पंढरपूरला होणाऱ्या आषाढीवारीच्या सोहळ्याची. महाराष्ट्रातून आळंदी, देहू, त्र्यंबकेश्वर, सासवड, एदलाबाद, पैठण, शेगाव इ. प्रसिद्ध संतांच्या गावांहून त्यांच्या पालख्या आषाढी एकादशीस पंढरपूरला जाण्यास हजारो भक्तांसह प्रस्थान ठेवतात. सर्वजण श्रीविठ्ठलाचे दर्शनासाठी भूवैकुंठ पंढरपूरला निघतात ते हरिनाम घोष करत. ऊन, वारा, वादळ, पाऊस कशाचीही पर्वा न करता. तसेच कार्तिकी एकादशीसही आळंदी व पंढरपूर येथे...
पितृपक्ष, अपरपक्ष, पितृपंधरवडा व भाद्रपद वद्य हे शब्द एका अर्थानेच वापरले जातात. वेदांच्या पितृयज्ञाला पुराणांमध्ये विस्तार मिळाला आणि त्याला श्राद्ध म्हणून ओळखले जाऊ लागले. पितृपक्ष किंवा पितृपंधरवडा फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. पण जेव्हापासून या पक्षात पितरांच्या श्राद्धाची परंपरा सुरू झाली तेव्हा पासून आजतायगत या परंपरेत फारसे बदल झाले नाही. ही परंपरा देखील प्राचीन काळापासून सुरूच आहे. श्राद्धाचा अर्थ श्रद्धेने...
अमरावती - : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये दाखल झाल्यानंतर जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. भाजपमधील अनेक आमदार आणि नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. तर दुसरीकडे  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार सुद्धा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचा वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आयोजित करण्यात आला होती. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे...
नवी दिल्ली - : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खळबळ उडवून देणारे बदल अखेर हाय कमांडने केले आहेत. विद्यमान कार्यकारिणीतल्या अनेक मोठ्या नावांना आणि मंत्रिपदावरच्या व्यक्तींना फाटा देत नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. नाना पटोले यांचं नाव प्रदेशाध्यक्षपदी चर्चेत होतंच. त्याप्रमाणे त्यांना राज्यातले मोठं पद देण्यात आलं आहे. पटोले यांनी अगोदरच विधानसभेच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्या अध्यक्षपदाबरोबरच 6 नवे...
मुंबई - आज मुंबईत शिवसेनेकडून इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला गेला. मुंबईतील दादर, गिरगाव, भायखळा , वडाळा, वांद्रे याभागात मोठ्या संख्येने सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. भायखळा भागातील आंदोलनात महापौर किशोरी पेडणेकर यांनी बैलगाडीत बसून या आंदोलनात इंधन दरवाढी विरोधात निषेध व्यक्त केला. ...