Homeवैशिष्ट्येशिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष -: छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस

शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष -: छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस

१६ ऑगस्ट इ.स.१६६६
छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यामधून पलायन करण्याचा दिवस आणि वेळ ही नियोजित करून ठेवली होती. हा बेत फक्त मोजक्याच मंडळींना माहीत होता. दि.१६ ऑगस्ट इ.स.१६६६ रोजी रामसिंह दरबारात गेल्यावर औरंगजेब त्यास म्हणाला, सीवा मनसब कबूल करील अशातऱ्हेने त्याचे मन वळवावे. त्याचे नातेवाईक व इतर लोक यास हुजूर बोलवावे. त्याने स्वतःचे किल्ले देऊन टाकावे.औरंगजेबचा निरोप मिळाल्यावर महाराजांनी उत्तर दिले.मला वतनावर पाठवावे, मग जो हुकूम होईल तो मान्य करीन. महाराजांनी पाठवलेला हा निरोप औरंगजेबास शेवटचा होता.कारण यानंतर जे घडणार होते ते संपूर्ण मुघल सलतनतीस अनपेक्षितच होते.

  • लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular