Homeघडामोडीसंकेश्र्वर आंबोली राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी लवाद अधिकारी नेमावा -...

संकेश्र्वर आंबोली राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी लवाद अधिकारी नेमावा – शिंदे गट

आजरा (अमित गुरव)-: आजरा गडहिंग्लज सावंतवाडी तालुक्यामध्ये संकेशवर ते आंबोली राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ एच वर रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी आजरा गावातील १३ गावांचा जमीन भूसंपादन करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 कलम 3(G) नुसार नुकसान भरपाई निवाडा
निश्चित करण्यात आला आहे पण सदर विषयात संबधित शेतकऱ्यांच्या अडचणी पूर्णपणे ऐकून न घेता निवाडा झाला असून त्यात त्रुटी आहेत . त्यासाठी सदर निवड्यातील शेतकऱ्याचे म्हणणे पूर्ण ऐकून जास्तीत जास्त मोबदला मिळावा यासाठी लवाद्यची नेमणूक करण्यात येणे गरजेचे आहे.
काही ठिकाणी हेतूपुरस्कार काही शेतकऱ्याचे बरोबर साठे लोटे करून रेखंकांमध्ये बदल करण्यात आले आहेत त्यामुळे इतर शेतकऱ्यावर अन्याय झाला त्यामुळे या सर्वाची पण चौकशी करायला हवी असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
आपण तालुक्याचे प्रमुख प्रशासन म्हणून लवाद अधिकारी नेमण्या संदर्भात राज्य व केंद्र शासनाला सूचित करावे. आणि जोपर्यत योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत कामकाज बंद ठेवावे असे निवेदन शिंदे गट नेते संजय पाटील आणि शेतकरी वर्गाने आजरा तहसीलदार यांना दिले आहे.

अमित गुरव
अमित गुरव
मुख्यसंपादक
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular