साखळीला बांधलेल्या कुत्र्याचं लोकांवर भुंकण,टाळ्या वाजवणाऱ्या जमातीचं जिंदगीवर थुंकणं,म्हणजे विद्रोह असतो का…..?
रस्ता चाचपडणाऱ्या बेवड्याच्या शिव्या,सत्तेची कुलुपं उघडणाऱ्या राजकीय चाव्या,म्हणजे विद्रोह असतो का…..?
आई बहिणीच्या अवयवांच्या नावाचा उद्धार,मंच पाहून बदलणारा लेखणीचा गद्दार,म्हणजे विद्रोह असतो का…..?
मनोरंजनासाठी लेखनात केलेला माकड चाळा,यमकासाठी मारलेला मुख्य आशयाचा गाळा,म्हणजे विद्रोह असतो का…..?
दिशाहीन मोक्कार सुसाट बेभान सुटलेला वारा,महापुरुषांच्या नावाचा नुसताच बेधडक मारा,म्हणजे विद्रोह असतो का…?
विद्रोह भडकलेला माथा नसतोविद्रोह...
नाच रे मोरा" या बालगीताच्या मुळ रचनाकारांची माफी मागून….
😀विडंबन रचना😀
नाच रे पोरा,मित्राच्या लग्नात,
नाच रे पोरा नाच..
छान छान मांडव सजला रे,
डिजेचा ठोका वाजला रे..
जोश घे अंगात, ये थोडा रंगात,
नागीण होऊन नाच....
नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात,
नाच रे पोरा नाच
गोरी गोरी छोरी बघती रे,
गालातल्या गालात हसती रे...
निघाली वरात,नाच तू जोरात,
दुखली जरी रे टाच....
नाच रे पोरा, मित्राच्या लग्नात,
नाच...
आजही आठवतं मलातुझं ते चष्म्यातून बघणंघायाळ व्हायचं हृदय माझंबघून तुझं,गालातल्या गालात हसणं
तुझं ते स्मित हास्यवेड लावायचं मलागालावर पडणारी खळीशोभून दिसायची तुला
बोटानं तू अलगद चष्माअन् गालावरील बट सावरायचीअल्लड तुझ्या या चाळ्यानंतू स्वर्गाची अप्सरा भासायची
नकळत मन माझंतुझ्यात गुंतलंबघ ना गं वेडेचष्म्यातल्या नजरेनं हे सारं हेरलं
आजही आठवतं मलागर्दीत तुझं चष्म्यातून चोरुन बघणंअन् एकांतात बोलतानाहीचेहरा हातातल्या ओंजळीत झाकणं
पहिल्या प्रेमाचीती सुरुवात होतीतुझ्या माझ्या भेटीसाठीआतुरलेली...
तुझ्या कानातलं डुलकसं हळूच डुलतंत्याच्या आवाजानंमन माझं तुझ्याकडं वळतं
चाफेकळी नाक तुझंत्यावर नथीचा तोराकमनीय बांधा अन्रंग तुझा गोरा
शराबी आहे तेलाल ओठ तुझेघायाळ करिती हेअल्लड हृदय माझे
स्मित हास्य तुझंगोड गालावर खळी गंप्रेम जडलं माझंतू गुलाबाची नाजूक कळी गं
गालावर येणारी बटतू अलगद बोटानं सावरजीवघेण्या त्या नजरेलातुच आता आवर
कपाळी तुझ्या बिंदीअन् चंद्रकोर टिकलीमिलनाच्या या रातीलाही लावण्यवती सजली
अंबाड्यात फुललाय तुझ्यामोगऱ्याचा गजराये मिठीत सजनेमधुचंद्र करुया...
गुलाबी थंडीत,चांदण्या रात्रीलामऊ मखमली गादीवर झोपूनतू पाहिलेल्या पक्क्या घराचं स्वप्न,मला कच्च वाटू लागलं…जेव्हा माझी आई म्हणालीपोरा..!सिमेंट काँक्रीट च्या चार भिंती म्हणजे घर नसतंमनाची मजबूत नाती म्हणजे घर असतं….
आईला इंग्लिश ग्रामरमराठी व्याकरण….इतिहासाचं प्रकरण,भूगोलाचा नकाशा….विज्ञानाची दिशा,आणि देशाची दशायातलं काहीच कळत नाही..पण तरीही…तिच्या महिन्याच्या घरखर्चातील,गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही..आणि भुकेच्या भूगोलातभाकरीचा प्रदेश शोधतानाआईच्या कष्टाचा वास्को द गामा कधी थकलाच नाही..
एकदा लाड लाडती...
आवताच्या भोकातखूपसलेल रूम्हण हे नुसतेजमीन वखरण्या साठीच नसूनआपल्या हक्कावर गदाआणणार्यांच्या टाळक्यातघालण्यासाठी आहे. अनत्यासाठीच बळीराजा त्यालाहातात घेईल तेंव्हाच खऱ्याअर्थाने क्रांतीची सुरवात होईल…
निखरट निष्ठूरांच्या जखमांनीरक्तभंबाळ झालेला बळीराजात्याने त्याच्या अंगावरच्याजखमा राखून ठेवल्याआहेत की प्रतीवार करतानाधार यावी म्हणून…
निष्कर्षाआधी आम्हालानिकषात अडकवनाऱ्यानोआमचा बळीवंश निशस्त्रकधीच नव्हता आणी नाहीही….
अवताच्या पासा,नांगराचे फाळ ,खूरपे,विळे कोयते,आसूड,दांडगे अन रूम्हण .तलवारी चालवण्याचा वारसाआहेच आमचाशस्त्र म्हणून जेंव्हा हातातयेईल ना तेंव्हा तूम्ही कितीहीसत्तेच्या कवच...
धनधान्याण भरलेल्याघरात सूख सामाधानाचभरत यावप्रफुल्लित व्हावा आसमंतप्रज्वलित व्हावीतकोदंलेली मणरूम्हण धरलेल्याहातान इतक बळकटव्हाव कि वामनाच्याछाताडावर रोऊणनागंर पुन्हाएकदाबळीच राज्य यावमाझ्या बळीराजाचराज्य याव
जगन्नाथ काकडे( मेमेसखेकर. )
शिवराय होण्यासाठी हातात तलवारघेऊन लढण्याची गरज नाही आताकारण कित्येक क्षेत्र अशी आहेत कीकित्येकांना होता येते प्रत्येक क्षेत्रांत शिवराय.वाटाही कित्येक आहेत,फक्त ठरवायचंआपले लक्ष अण चालाय लागायचेधेय्यस्थळ गाठोस्तर ध्येयाप्रती पूर्णइमानदारी ठेवून,मग कुणीच मारणार नाही आपल्या पुढे बाजी.
एखादा ध्येय्यवेडा कलाकारही होऊ शकतो शिवराय,समाजोन्नतीच्या उदात्त ध्येय्यानेप्रेरीत नेताही होऊ शकतो शिवराय,स्वतःपूढे शिवराय होण्याचे स्वप्नएखादा क्रिडापट्टूही ठेवू शकतो,आपल्या शेतात प्रगत तंत्राने शिवशाहीचधान पेरून शेतकरी ही...
कलीयुगाच्या झाडालाही मोहर आला आहेपण फळाचा पत्ता नाही नुसता पाला आहे
दह्या दुधाची अवीट गोडी पांचट झाली आतादुधवाल्याची म्हैस नाही रेडा व्याला आहे
भाऊ त्याला भार वाटतो काम करुनही सारेबसून खातो तरी चालतो त्याचा साला आहे
पत्नीचे जो बोल ऐकतो मान हलवतो नुसतीसमजुन जावे तो नवरा तर बैलच झाला आहे
मायपित्याचे प्रेम तयाला ते मेल्यावर कळलेम्हणून दिसतो रोजच त्याच्या हाती प्याला आहे
लग्न न...
मी दहा पंधरा वर्षांच्याकालखंडानंतरजेंव्हा त्याला पहील्यांदापाहीलतेंव्हा त्यावेळचा तोआणि आजचा तोयांच्यात मला खुपचंतफावत जानवत होतीपण…..जानवलत्याचं अंतर्मन मात्रतसंच होतं . किंबहुना तेपहील्या पेक्षा अधिकपरीपक्व आणिखंबीर बनलं होतंत्यावेळी त्याच कॉलेजमधले पहीले पाऊलचकित्येक तरुणींच्याहृदयाची धडधडवाढवायचं.इतका तो होतागुजगूजीत गोरासर्वांनाच हवाहवासाहोता त्याचा संबंध तोरात्याच हासनं, खेळनं,वागनं,बोलनं,चालणं होतं सगळ्यांसाठीसगळ्यांचं .पण..आज त्याला पहील्यांदाचपाहील्याबरोबर मलारहावेलेच नाही, नाही रहावेलेमाझ्या मनाला,नाही रहावेलेमाझ्या शब्दानांतब्बेतीण जरा जास्तचउतरलाय रे असा कोनतासाव्याप लागलाय तूझ्या...










