Home Blog Page 32
इचलकरंजी ( प्रतिनिधी ) इचलकरंजीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याच्या गंभीर प्रकरणानंतर आता गावभाग पोलीस ठाण्याच्या “करिअर मार्गदर्शन शाळा” उपक्रमावरही संशय व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी हा घातपात असल्याचा थेट आरोप केला असून, या संदर्भात आठवडाभरात पोलीस ठाण्याकडून कोणतीही अधिकृत माहिती माध्यमांना देण्यात आलेली नाही. राज्य शासनाने डिजिटल मीडियाला अधिकृत मान्यता दिलेली असतानाही, काही पोलीस ठाण्यांमध्ये अजूनही डिजिटल...
आजरा (हसन तकीलदार ) :-महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करून मराठी शाळा बंद करण्याच्या दिशेने घेतल्या जात असलेल्या राज्यसरकारच्या धोरणाला विरोध असून पहिलीपासून हिंदीची सक्ती धोरण मागे घेण्यासाठी आजरा तालुका पुरोगामी व प्रागतिक पक्ष संघटनेने तहसीलदार यांना निवेदन देत हिंदी सक्ती करू नये असे म्हटले आहे. ...
नवी दिल्ली/मुंबई – केंद्र आणि राज्य सरकार महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवत आहेत. अशाच एक योजनेअंतर्गत आता लाखो बहिणींना स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. विशेष म्हणजे, या कर्जावर सरकारद्वारे व्याज सुद्धा सबसिडीच्या स्वरूपात दिले जाणार आहे. ✅ योजनेचे नाव – महिला उद्योजकता विकास योजना / महिला स्वयंरोजगार कर्ज योजना 🔍 योजनेचा उद्देश गृहिणी, ग्रामीण महिला,...
आजरा (हसन तकीलदार ):-जनता एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. बदलत्या जीवन शैलीमुळे जीवनात योगाला अनन्य साधारण महत्व आले आहे. त्यामुळे योगाला जग मान्यता मिळाली आहे. यासाठीच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. https://linkmarathi.com/dear-sisters-will-get-a-loan-of-rs-1-lakh-know-the-complete-process-eligibility-and-required-documents/ श्री रवळनाथ प्राथमिक विद्या मंदिरातील शिक्षक सूरज बिद्रे यांनी योगदिनाचे महत्व सांगताना म्हणाले कि, योगामुळे आपण...
चंदगड (प्रतिनिधी): चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयातील वैद्यकीय सुविधा, कर्मचारी, औषध पुरवठा व इमारतीच्या स्थितीचा आढावा आमदार शिवाजी पाटील यांच्या कडुन घेण्यात आला. पाहणीदरम्यान रुग्णालयाची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. https://youtu.be/p5ncD8Juu90?si=1OUkmDCB5JpiMkkr रुग्णालयाच्या बाथरूम्सना दरवाजे नाहीत, विजेचे दिवे...
आजरा (हसन तकीलदार ):-व्यंकटराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आजरा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. योगाचे जीवनात अनन्य साधारण महत्व आहे. धावपळीच्या आजच्या युगात नियमित योगा केल्यास जीवन निरोगी बनू शकते. योगाचे महत्व हे अनमोल आहे. हे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर ते मन, शरीर, आणि आत्मा यांना जोडणारे एक प्राचीन शास्त्र आहे. योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य...
आजरा (हसन तकीलदार ):-मागील दोनवर्षांपासून संकेश्वर बांदा महामार्गाचे काम सुरु होते. आता ते पूर्णत्वास गेले आहे. परंतु या महामार्गावरील रस्त्याशेजारील गटारी योग्यरित्या न बांधल्यामुळे काही ठिकाणी त्रास तर होतच आहे परंतु धनगरमोळा परिसरात गटारीच बांधल्या नसल्यामुळे पावसाचे रस्त्यावरील पाणी घरामध्ये घुसण्याचे प्रकार सुरु आहे. पावसाच्या सुरवातीलाच ही परिस्थिती असेल तर संपूर्ण पावसाळा आम्ही झेलायचा कसा असा प्रश्न तेथील रहिवासी...
आजरा(हसन तकीलदार):बालक मंदिर शाळेच्या उदघाट्न कार्यक्रमानंतर लगेचच आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील मतदार संघांचे तुकडे केल्याबद्दल आणि जिल्हापरिषद गण कमी केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी खंत आणि नाराजी व्यक्त केली. प्रत्येकाने आपले म्हणणे मांडले व त्यावेळी पालकमंत्री आणि चराटी यांनी आपले मत व्यक्त करीत आढावा घेतला. ...
आजरा (हसन तकीलदार ):-येथील जनता एज्युकेशन सोसायटीच्या आदर्श व रवळनाथ बालक मंदिर शाळा नूतन इमारतींचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्य मंत्री नाम.प्रकाश आबिटकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आण्णाभाऊ समूहाचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी हे होते. स्वागत आणि प्रास्ताविक आदर्श बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका साधना नारे यांनी केले. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी स्वागतगीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवारांचा सत्कार...
आजरा (हसन तकीलदार):-मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत ग्रामीण रुग्णालय आजरा येथे नवीन डायलेसिस सेंटर सुरु करणेत आले आहे. त्याबद्दल सर्वत्र कौतुक व समाधान व्यक्त होत आहे. सर्वसामान्य, गरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात डायलेसिसचा खर्च न परवाडणारा आहे. ग्रामीण रुग्णालयात डायलेसिस सेंटर सुरु झाल्यामुळे सर्वसामान्य, गरीब रुग्णांना याचा चांगला लाभ होत आहे.परंतु या सेंटरमध्ये जर एखादा रुग्ण अस्वस्थ झाला किंवा प्रकृती गंभीर झाली...